यहा तक आते आते सूख जाती है कई नदिया….
by Nikhil Sheth
एक सुंदर शेर आहे – यहा तक आते आते सूख जाती है कई नदिया, मुझे मालूम है, पानी कहा ठहरा हुआ है…कवी आहे दुष्यंत कुमार…एकदा वाचायला सुरु केला की नो थांबणे…दुष्यंत कुमार म्हणजे जादू. बस, जादूच अजून काही नाही. त्यांच्या कविता नुसत्या वाचत राहाव्यात…साये में धूप मधली ‘आग जलनी चाहिये’ तर फेमस आहेच…पण आज त्यांची एक वेगळी कविता सादर करतो
त्यांचे जेव्हा साहित्याच्या मंचावर आगमन झाले तेव्हा हिंदी साहित्य सृष्टी काहीतरी विचित्र अवस्थेमध्ये होते. कैफी भोपाली यांच्या तरक्कीपसंद गजला फेमस होत्या तर कोण अज्ञेय नावाच्या कवीच्या महाकठीण कविता गाजत होत्या…असे म्हणतात की तेव्हा सामान्य माणसाला समजेल, किंवा सर्वसामन्याच्या सामान्य भावनांना वाट देईल असा कवीच नव्हता. आणि तेव्हा हिन्दि-उर्दु मध्ये दुष्यंत कुमारांनी पाऊल ठेवले आणि नुसतेच नाही तर असे दमदार पाउल ठेवले की रसिक सगळे आवक झाले.
स्वातंत्र्य तर मिळाले होते, पण स्वप्न साकार झाली नव्हती…हळू हळू, लोकांच्या नजरेत आले की आपला खरं शत्रू कोणी गोरा माणूस नसून आपलीच प्रवृत्ती आहे…जी सत्ताधारी बनून आपल्यावर शतकानुशतके राज्य करत आहे….समाजवादाचा सगळीकडे बोलबाला होता…तेव्हा ते म्हणतात - भूख है तो सब्र कर रोटी नहीं तो क्या हुआ आजकल दिल्ली में है ज़ेर-ए-बहस ये मुदद्आ| गिड़गिड़ाने का यहां कोई असर होता नही पेट भरकर गालियां दो, आह भरकर बददुआ| इस शहर मे वो कोई बारात हो या वारदात अब किसी भी बात पर खुलती नहीं हैं खिड़कियां|
अतिशय मार्मिक…पण म्हणून निराशावादी नव्हे…आशावाद वाचवा तर हरिवंशराय बच्चन आणि दुष्यंत कुमारांचा…एका ठिकाणी त्यांनी सुंदर लिहून ठेवले आहे -एक चादर साँझ ने सारे नगर पर डाल दी, यह अंधेरे की सड़क उस भोर तक जाती तो है। दुख नहीं कोई कि अब उपलब्धियों के नाम पर, और कुछ हो या न हो, आकाश-सी छाती तो है।
खूप पूर्वी एक सिनेमा येऊन गेला होता – काबुलीवाला म्हणून…ती टागोरांची एक लघुकथा आहे. त्यातले गाणे खूप गाजले होते – अये मेरे प्यारे वतन…संगीत रवी शंकरांचे आहे…देशापासून दूर गेल्यावर मनाची अवस्था त्यात चितारली आहे…एक प्रकारचे विरह गीतच आहे ते…बोर्डर मध्ये पण तसेच एक गाणे आहे…माचीस मध्ये पण….तशीच यांची पण एक कविता आहे….चांदनी छत पे चल रही होगी अब अकेली टहल रही होगी; फिर मेरा ज़िक्र आ गया होगा वो बर्फ़-सी पिघल रही होगी, तेरे गहनों सी खनखनाती थी बाजरे की फ़सल रही होगी;जिन हवाओं ने तुझ को दुलराया उन में मेरी ग़ज़ल रही होगी
एका ठिकाणी ते म्हणून जातात - तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यक़ीन नहीं…वास्तवावर ओरखडे ओढणे हे तर साहित्यिकांचे आजीवन कर्तव्यच जणू…..बहुत मशहूर है आएँ ज़रूर आप यहाँ,ये मुल्क देखने लायक़ तो हैहसीन नहीं….आता बोला…पण म्हणून दुष्यंत कुमार काय फक्त वास्तवाचे कवी नव्हते…किंवा मनस्वी पण नव्हते…स्वप्नील आशावादी कविता करून थांबले नाहीत…समाजावर आघात करूनही वैतागले नाहीत…..त्यांची कविता ही त्यांची कविता होती…माणूस हा त्याच्या कर्तव्याने स्पष्ट होत जातो…मी जे खातो, जे पितो, जे बघतो, जे करतो, जे वाचतो, जे ऐकतो यापेक्षा मी असा वेगळा कोणी नाही..मी हाच आहे….मर्ढेकर जसे म्हणतात – आभाळाच्या पल्याड स्पंदन, टिपरी त्याची या मडक्यावरी…असेलही खरे…पण मला हे मडके दिसते….आभाळाच्या पल्याड जे काही असेल ते असो…माझी कविता कुठून येते? कुठून स्फुरते? त्यात आभाळाच्या पल्याडचा सहभाग किती आणि निसर्ग-समाजाचा किती? आणि माझी त्यात भर काय? या कवितेच्या पुढे-मागे माझे अस्तित्व काय? माझे सगळे विचार यात आहेत का? की त्यापेक्षाही मी कोणी वेगळा आहे? त्यांचीच एक कविता वाचा….
मैं जिसे ओढ़ता—बिछाता हूँ; वो ग़ज़ल आपको सुनाता हूँ; एक जंगल है तेरी आँखों में; मैं जहाँ राह भूल जाता हूँ
तू किसी रेल—सी गुज़रती है; मैं किसी पुल-सा थरथराता हूँ; हर तरफ़ ऐतराज़ होता है; मैं अगर रौशनी में आता हूँ
एक बाज़ू उखड़ गया जबसे; और ज़्यादा वज़न उठाता हूँ; मैं तुझे भूलने की कोशिश में; आज कितने क़रीब पाता हूँ
कौन ये फ़ासला निभाएगा; मैं फ़रिश्ता हूँ सच बताता हूँ
mastach ahe re..chan zali ahe post
Nikhil Sheth (Bhesheche tumhi shethach ahat),
Mi apalya blogcha niyamit vachak zalo ahe. Mala marathitil sarv santachya kavyanche bodhpar vivechan lihilele pustak have ahe. Asha pustakachi tumhala kalpna ahe kay? He sarv kavya pudhil linkwar ahe: http://www.aathavanitli-gani.com/Lists/Master%20Lists/Sant%20Wani.htm
Agrim abhar.
अरुण, कॉमेंटबद्दल आभार.. मला असे पुस्तक ठाऊक नाही. मात्र असे पुस्तक असणे अपेक्षित आहे खरे…