दिसामाजी काहीतरी

तू अभी रहगुज़र में है – इक़बाल

तू अभी रहगुज़र में है क़ैद-ए-मकाम से गुज़र
मिस्र-ओ-हिजाज़ से गुज़र, पारेस-ओ-शाम से गुज़र

जिस का अमाल है बे-गरज़, उस की जज़ा कुछ और है
हूर-ओ-ख़याम से गुज़र, बादा-ओ-जाम से गुज़र

गर्चे है दिलकुशा बहोत हुस्न-ए-फ़िरन्ग की बहार
तायरेक बुलंद बाल दाना-ओ-दाम से गुज़र

कोह शिग़ाफ़ तेरी ज़रब तुझसे कुशाद शर्क़-ओ-ग़रब
तेगे-हिलाल की तरह ऐश-ओ-नयाम से गुज़र

तेरा इमाम बे-हुज़ूर, तेरी नमाज़ बे-सुरूर
ऐसी नमज़ से गुज़र, ऐसे इमाम से गुज़र

कर्झन आणि ताजमहाल

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दीडशे वर्ष पूर्ण झाली या वर्षी. त्याच्यानिमात्ताने एका पुस्तकातील हा उतारा…

Alone among India’s viceroys, Curzon devoted substantial energy to archaeological preservation. He reorganized the Archaeological Survey into and efficient administrative body and tirelessly toured India’s ancient monuments. He was the first governor-general in 80 years to visit Gaur, Bengal’s historic capital, and one of only two in a century of British rule ever to tour the Hindu shrines of Brindaban. Curzon’s obsession, however, was the Taj Mahal, which he visited six times during the course of his viceroyalty. Convinced that the local engineers were ‘destitute’ of the ‘finest artistic perception’, he set on foot a number of restoration projects, which he then supervised with a single-minded devotion to detail. Behind this commitment to precision lay, however, a world of ‘oriental’ fantasy. Curzon dressed the hereditary custodians of the tomb, for instance, in the white suits and green scarf that he decided was ‘the traditional garb of the Mogul days’. He ordered the removal of ‘garish english flowers’ for the gardens and their replacement by a row of cypress trees framing the Taj at the end. And he determined to procure a hanging lamp for the domed chamber above the cenotaphs. As the style of the Taj was, in his view, Indo-Saracenic, ‘which is really Arabic’, he asked Lord Cromer, British proconsul in Egypt, to design a lamp for him modeled on those still to be found in the mosques of Cairo. Dissatisfied with Cromer’s suggestion, Curzon then sought, unsuccessfully, to locate a copy of his childhood illustrated edition of ‘The Arabian Nights’ as a source for suitable designs. Finally, during his trip back to England, upon his retirement from the viceroyalty, he stopped in Cairo, where he selected the design for the lamp, installed in the Raj in 1906, which still hangs over the tomb chamber.

आजच्या बातम्या..!

भाग १ -

सोव्हिएत युनिअनने अफगानिस्तानमधून माघार घेतल्यावर तिथल्या मुजाहिदीनांना वाटले की त्यांचा विजय झाला. एकच उन्माद आणि जल्लोष. रशियन तर गेले पण जिहाद असा थोडक्यात कधी संपतो का? त्यांच्याकडे शक्ती होती, हत्यारे होती, स्किल्स होती, मनुष्यबळ होते आणि आता जबरदस्त आत्मविश्वास देखील. एका जागतिक महासत्तेला हरवणे म्हणजे खायची गोष्ट नाही. पण हे लोक मग तिथेच थांबले नाहीत. ते घुसले जम्मू-कश्मीर मध्ये… जिहादचा नारा देत. त्याला पार्श्वभूमी होती ८७च्या निवडणुकीमध्ये केंद्राने केलेल्या चुकांची. आणि तिथून सुरु होतो कश्मीर मधील घुसखोरीचा आधुनिक कालखंड. त्याची परिणती कशात झाली? एक – राष्ट्रीय रायफल्स ची स्थापना. म्हणजेच सीमेव्यातिरिक्त नागरी भागात लष्कराची प्रचंड नेमणूक. आणि त्यासाठीचा अत्यावश्यक भाग म्हणजे दोन – आफ्स्पा जो की फक्त पूर्वांचलातील राज्यांसाठी होता त्याला कश्मीर मध्ये लागू करणे. तेव्हाच पंडितांनापण हुसकावून लावण्यात आले. बऱ्याच लोकांना यासीन मलिक वगैरे माणसे पण आठवत असतील.

भाग २ -

आता आपण गेल्या काही दिवसात आलेल्या दोन बातम्या पाहू -

१ ऑगस्ट – सिंकीआंग मधील मुस्लीम अलहदगीला पाकिस्तानातून होणारी मदत ताबडतोब थांबवावी – चीन

१० ऑक्टोबर – चीन पाकिस्तान रेल्वे मध्ये चीन मोठी गुंतवणूक करणार.

१२ ऑक्टोबर – पाकव्याप्त कश्मीर मधील चीनी सैनिकांची उपस्थिती चिंताजनक – भारत

भाग ३ -

मागच्या वर्षी हुंझा प्रांतात अताबादजवळ झालेल्या भूस्खलनात काराकोरम हायवे (जो इस्लामाबादला चीनशी जोडतो आणि पाकव्याप्त कश्मिरातून जातो) बंद पडला होता. साधारणतः हिमालयातले रस्ते नदीच्या किनाऱ्याने जातात. भूस्खलनामुळे नदीप्रवाह थांबला आणि प्रचंड मोठे नैसर्गिक धरण तयार झाले. आता ते फोडले तर त्याखालची गावे वाहून जातील आणि नाही फोडले तर रस्ता बंद. या विवंचनेत बरेच दिवस काढल्यावर शेवटी चीनी तंत्रज्ञांना आणि सैनिकांना पाचारण करण्यात आले. त्यांनीच तो रस्ता बांधला होता. त्यांनी त्याच्या थोडा वरून दुसरा रस्ता बांधून दिला आणि पाकिस्तान-चीन खुष्कीचा मार्ग पुन्हा सुरु झाला. या कारणामुळे चीनी सैन्य पाकव्याप्त कश्मीर मध्ये तेव्हापासून किंवा त्याच्याही पूर्वीपासून आहे. त्यात त्यांनी आता रेल्वे बांधायला घेतली आहे. त्यात नवे काय आहे? (चिंता तर पूर्वीपासूनच करतोच आहे, कारण आपल्याला तेवढेच करता येते) मग ही १२ ऑक्टोबर ची बातमी का?

भाग ४ -

आता हे तीनही भाग जोडले की लक्षात येईल.

अमेरिका हळूहळू अफगाणिस्तानातील आपले सैन्य कमी करत आहे. तिकडे पश्तून तालिबान, पाकिस्तानी तालिबान, आणि ताजिक व हाजरा लोकांची नॉर्दर्न अलायन्स जोरदार कार्यरत आहेत. यांना हळू हळू मोकळे रान मिळेल. मग ते परत कश्मीर मध्ये आणि सिंकीआंग मध्ये घुसून जिहाद पसरवण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. पाकिस्तानची आधीच स्वतःची वाट लागली आहे. कराची मध्ये रोज होणाऱ्या १५-२० कत्तली, उर्दू मुहाजिर-पश्तून-सिंधी लढा, बलुच लोकांचा जोरदार लढा, सरऐकी आणि बहवालपूर सुभे तयार करायचे की नाही, गेल्या वर्षी आलेला प्रचंड पूर, अमेरिकेने थांबवलेली मदत, विजेची अती-प्रचंड कमतरता आणि त्यामुळे होणाऱ्या दंगली, आणि परवाच नवाज शरीफांनी पुकारलेला झरदारी विरोधी लढा, आजच्याच बातमीनुसार बंद पडण्यास आलेली रेल्वेसेवा. त्यांना स्वतःचाच डोलारा सांभाळता येत नाहीये. पाकिस्तानी तालिबान, तेहेरिक, लष्कर सगळे डोईजड झालेत. त्यामुळे चीनने त्यांच्यावर विसंबून न राहता स्वतःच नाकाबंदी करायची ठरवली असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. आणि ते लोक निर्णय घेऊन कार्यरत पण करतात. त्यांच्या हातून इतक्या सहजासहजी सिंकीआंग सुटणार नाही. ती नाकाबंदी साहजिकच पाकव्याप्त कश्मीर मध्येच करायला लागणार. ‘विकास’ हे उत्तर प्रत्येक प्रश्नाला लागू पडते हे सगळ्या राजकारण्यांना कळते. चीननेही सिंकीआंग मध्ये दोन नवे मोठे सेझ जाहीर करून काम सुरु केले आहे. तिथे जायला तिबेट, गोबी, टकलामकान पार करून जावे लागते जे दुर्गम आहे. तेव्हा पाकिस्तानातूनच रेल्वे केली तर सोयीचे, म्हणून मग पाकव्याप्त काश्मिरातून रेल्वे बांधत आहेत. त्याचवेळी जर हे सगळे मोकळे झालेले मुजाहिदीन आलेच तर त्यांना सिंकीआंग मध्ये घुसून द्यायचे नाही – तर कश्मीर मध्ये डायव्हर्ट  करणे सोप्पे नाही का? तेवढेच भारत पण गडबडेल… उगाच नाही भारताने जाहीर स्टेटमेंट दिले की चीनच्या या हालचाली चिंताजनक आहेत.

भाग ५ -

सगळ्या बातम्या रोज पेपरात येत असतात. पण त्यांच्यात एक माल गुंफून अर्थ काढता आला तर त्या पेपर वाचण्याला अर्थ

Blog

आणि आज हा एक ब्लॉग गवसला. अवचितच गवसला… खूप वर्षांनी ‘हेच ते, हेच हेच शोधत होतो’ असं झालं. तुम्हा लोकांचे ठाऊक नाही पण ज्यांची किमान सांस्कृतिक वंचना आणि आत्मिक घुसमट (हा येडा आहे का?) त्यांच्यासाठी हा ब्लॉग जालीम उपाय तरी आहे किंवा … जाऊदे चायला शब्दांची चणचण भासते आजकाल. त्यातच काय ते समजून घ्या. तर हा ब्लॉग मिळाल्यावर अधाशासारखा वाचून काढतो आहे. अजून निम्मादेखील झाला नाही तरी वाईट वाटायला लागले… संपला तर? पुढे? ‘रारंगढांग’ वाचताना प्रत्येक वेळी होते तसे. ‘युगांत’ जेव्हा संपायला आले होते तेव्हा शेवटची पंचवीस पाने वाचायला पंचवीस दिवस घेतले होते. संपल्यावर उगीच अधांतरी वाटायला नको. अगदी तसेच गोर्कीच्या ‘मदर’ चे वा पास्तरनाकच्या ‘झिवागो’ चे झाले होते…. अर्थात ही पुस्तके वाचून काळ लोटला, जमाना झाला, मुद्दते हुई वगैरे वगैरे. त्याचीच अंधुकशी जाणीव हा ब्लॉग वाचताना झाली. काही काही लोक इतके उत्कटतेने लिहितात, वाचताना जणू वाटते की लेखाचे मनच वाचतो आहे. लेखापलीकडे लेखक दशांगुळे उरतो हे विसरूनच जातो. लेखकाची ही जशी खासियत तसेच दुर्दैव देखील. हरकत नाही. जमल्यास नक्की वाचा.

तूफां कर रहा था…

हजार योजने प्रवास…. स्थलकालाचा, मनोविश्वाचा.. आणखी फक्त दिडेक महिना आणि या Land of Freedom and Beacon of Hope ला कायमचा रामराम. जननी जन्मभूमीकडे प्रयाण. कालच एक दोनेकशे वर्ष जुनी पाण्यावर चालणारी चक्की, शेतीची साधने आणि इतर यांत्रिक अवजारे पहायला एका ठिकाणी गेलो होतो. येताना मित्राने शेर ऐकवला… कधी कधी गोष्टी घडून जातात आणि मग सार्थकता जाणवते. घरी आल्यावर शेर मनात घोळत राहिला आणि आज तर नुसता छळून राहिला…. अर्ज है -

तूफां कर रहा था मेरे अज्म की तवाफ़, दुनियावालोंको लगा की कश्ती तूफां में है…!

Follow

Get every new post delivered to your Inbox.